जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी कट्टरतावाद्यांनी घडवलेल्या क्रूर हल्ल्याने भारत आणि पाकिस्तानातील तणाव अभूतपूर्व पातळीवर पोहोचला. या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आणि भारताने ठोस पावले उचलण्याचा निर्धार केला. यातूनच जन्म झाला ‘ऑपरेशन सिंदूर’चा, ज्याअंतर्गत भारताने 7 मे 2025 रोजी पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करून 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारताने स्पष्ट केले की, ही कारवाई फक्त दहशतवादी तळांपुरती मर्यादित होती. मात्र, या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 8 आणि 9 मे रोजी पाकिस्तानने ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला, जे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने यशस्वीपणे हाणून पाडले. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक लष्करी कारवाई नसून, दहशतवादाविरुद्ध भारताच्या दृढनिश्चयाचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. या मालिकेत आपण या ऑपरेशनच्या प्रत्येक पैलूचा सखोल अभ्यास करणार आहोत.